Saturday, June 6, 2026
Google search engine

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील वल्लरी अविकांत पाल हिची निवड
मूल तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन २००७-०८ पासून केंद्र सरकारमार्फत आयोजित करण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शिष्यवृत्तीप्राप्त प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना सन २०१७-१८ पासून दरमहा एक हजार रुपये या प्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
नववी ते बारावी या चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळते. या शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील कुमारी वल्लरी अविकांत पाल ही विद्यार्थिनी पात्र ठरली. तिचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या .

RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments